मी सुसिमा,
“ऋणानुबंधाच्या गाठी”
आजच्या बदलेल्या जीवनशैलीतून मला ही कविता सुचली, समीक्षण करावे… “ऋणानुबंधाच्या गाठी” या शीर्षकात स्वतःचे लेखन करते. थोड उशिरा पाठविलेली कविता….
विषय – कुठे गेले ते दिवस..
*तो एक काळ होता,
मामाच्या गावाला जायची आतुरता असायची,
मामीच्या हातची पोळी भाजी,
अमृतासमान लागायची.
झोपाळा , सूरपारंब्या,
शेतात मैफल जमायची,
पाण्यात डुंबण्याची मजा,
आकाश ठेंगणं करायची.
सागर-गोटे वडाच्या सावलीत,
पटकन जागा बळकावायचे,
रंगीबिरंगी काचाकवड्या,
लक्षवेधून रंगायचे.
आता मात्र तसे नाही,
गेलेले दिवस परत येत नाही…
प्रत्येकाच्या हातालाही,
आता मोबाईल शिवाय करमत नाही.
छोटा भीम, डोरेमॉन
लहान मुलांना खेळवू लागला,
पोहणे ,लपंडाव, सायकलींना,
कायमचा रामराम मिळाला.
छोटी छोटी मुलं आता ,
लठ्ठ होऊ लागली,
फास्टफूड खाऊन,
आजारांशी सलगी करू लागली.
मुलांना गोष्टी सांगणारे आजी-आजोबा,
आता गोष्टीतही दिसत नाहीत,
आजी-आजोबानाही आता,
नातवंडाचे अप्रुप वाटत नाही.
मामाच्या गावी जावं कोकणात,
तर तोही उरला नाही,
चिल्या – पिल्यांच्या गाण्यात,
मामाचा गाव कुठे दिसत नाही.
नाही सांगावं वाटत,
दुःख मनीच कुणा,
मनाचा प्रत्येक कोपरा,
होऊन गेला सूना.
नाही उरला प्रेम जिव्हाळा,
नाही राहिली ओढ,
मनामनात साचून राहिली,
नात्यांबद्दल तेढ.
समजाव लेकरांना देवा तुझ्या,
करीन मी नवस,
सांगा येतील का परत माझे,
सोनेरी हरवलेले दिवस?????
– सुसिमा
@All rights are reserved.
Image source – Google.