पावसाळ्यात म्हणजे वर्षाऋतूत येणारा श्रावण महिना याची महती ती काय वर्णावी??? सर्वच परिसराला सर्वांनाच आपलं क्षणभर अस्तित्व विसरायला लावणारा आणि यथेच्छ पणे जीवनाचा आनंद घेण्यास भाग पाडणारा हा श्रावण महिना म्हणजे सर्वांसाठी पर्वणी ठरते.
श्रावणात ला आणखी एक उल्हासाचा विषय म्हणजे भरलेले गर्द निळे आभाळ आणि ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ…… चिंब भिजवणार्या आणि मन प्रफुल्लीत करणाऱ्या सरी तर घटकेत त्या भिजलेल्या सृष्टीला पुन्हा कोवळ्या किरणांनी न्हाऊ घालणारे कोवळे उन…. श्रावणातल्या या सरी आणि हे वेगळे वातावरण म्हणजे परमेश्वराचे वरदान जणू. या बरसणाऱ्या सरी आणि त्यांच्या जोडीला येणारा हा उन्हाचा कोवळा शिडकावा म्हणजे विधात्याला पडलेली भूल जणू. … एकमेकांसोबत अनाहूतपणे राहणाऱ्या या गोष्टीला सख्याची उपमा दिली तर त्यात नवल ते काय वाटावे???? फूला पानांना लतावेलींनी वृक्षवल्लींना आणि पर्यायाने सर्व निसर्गालाच वेडे करून सोडणारा हा श्रावण महिना….. आपल्यालाच नव्हे तर पशू पक्ष्यांनाही वेड लावून जातो…. प्रेम करणाऱ्या प्रेमिकांना एकमेकांना साद घालायला लावणारा हा श्रावण महिना धरित्रीला जणू हिरवा शालुच नेसवितो… हिरवाईने नटलेली सृष्टी पाहता आपणच मंत्रमुग्ध होऊन जातो, त्याच वेळी त्या चिंब पावसानंतर आकाशात सप्तरंगांची उधळण करत येणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य यासृष्टीच्या सौंदर्यात अजुन भर टाकत त्याच वेळी मोराचे थुईथुई नाचणे तिचे सौंदर्य अजून वाढवते येणाऱ्या श्रावण सरी या धरणीची तहान पूर्णत्वाने भागवितात. माळावर येणाऱ्या हिरवळीत गाईंसाठी येणारे हिरवे हिरवे गवत…. डोळ्याला एक वेगळीच शांतता देऊन जाते.. पाखरांना, धुंद बागडायला लावणारा पशुपक्ष्यांची साधा एकूण प्रतिसाद देणारा, गाईगुरांना मुक्तविहार यायला लावणारा, फुला ,फळांना ,लतावेलीना न्हाऊ घालणारा, फुलाच्या त्या कळीला अलगत चुंबुन उमलायला लावणारा आणि प्रियकर-प्रेयसीचे नाते घट्ट करणारा हा श्रावण सर्वांसाठी नवजीवन घेऊन येतो नाही का???
धुंद होऊन बेभानपणे उंचावरून कोसळणारे धबधबे क्षणभर नजर स्थिर करायला लावतात त्यांचे ते फेसाळते पांढरेशुभ्र रूप नजरेची तहान निश्चितच भागवतात. त्यांचे उंचावरून कोसळणे आणि पुन्हा त्याच उत्साहाने नदीला भेटणारा धबधबा पाहिला काळजाची अलगद छेडली जाते ,हिरव्या हिरव्या छोट्या छोट्या गवतावर स्थिरावलेले पाण्याचे थेंब आणि काठावर अलगत पसरलेले हिरवे शेवाळ.. जणू सृष्टीच्या एका नव्या रुपाची आठवण करून देते, डोंगरमाथ्यावर त्यांचा आधार घेऊन सरकणारे पाण्याने भरलेले मेघ त्यांची वेगळीच ओळख निर्माण करतात.
सणावारांचा, उत्साहाचा आणि आनंदाची उधळण करणारा हा श्रावण महिना. याच महिन्यात नागपंचमी हा सण येतो या सणांसाठी होणारी त्यांची लगबग लाह्या, नागपंचमीची गाणी आणि या सर्वांसाठी लहान मुलींपासून आबालवृद्ध पर्यंत एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो, यासाठी धरला जाणारा भावाचा उपवास ही एक रूढ परंपराच आहे, नागपंचमीच्या उत्साहानंतर याची सर्व बहिणी आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा दर्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी दर्यावर्दी रत्नाकराला श्रीफळ अर्पण करतात जेणेकरून वर्षभर मासेमारी करून उदरनिर्वाह करता येईल.. त्यानंतर वेध लागतात ते बाप्पाच्या आगमनाचे..
असा सणावारांनी नटलेला, उत्साहाने भरलेला विधात्याने निर्मिलेल्या या सृष्टीची नवी रूपे उलगडून दाखवणारा, या वसुंधरेला नटवू पाहणारा तिला सजवणारा पर्यायाने सर्व प्राणिमात्रांना आणि निसर्गाला तृप्त करणारा, सुखावू पाहणारा श्रावण सर्वांना हवाहवासा वाटतो… हसत हसत येणारा , नाचत येणारा, लाजत येणारा, हा श्रावण सृष्टीला नवजीवन चा देतो….नाही का??
सुसिमा .









