मनोरंजनाचे एक साधन म्हणून आपण टीव्ही सगळेच बघतो. या टीव्ही ने घरातल्या प्रत्येक माणसाचा ताबा घेतला आहे. सिरीयलची वेळ झाली की, घरातली हातातली काम तिथेच ठेवून गृहिणी पासून, आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना त्या मालीकांचे वेड लागून गेलं. सध्या गेली चार वर्षे झी टीव्हीवर चालू असणारी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हि सीरियल सगळेच पाहतात. त्यानंतर स्टार प्रवाह वर चालू असणारी आई कुठे काय करते ही मालिका असो किंवा झी मराठी वर प्रसारित करण्यात येणारी,’ अग बाई सासुबाई !’ ही मालिका असो, प्रत्येक मालिकेतील प्रत्येक स्त्रीचा संघर्ष आपल्याला आयुष्याच्या वेगळ्या वळणावर आणून सोडतो.’ माझ्या नवऱ्याची बायको’ या सिरीयल मध्ये प्रचंड मानहानी आणि अपमान सहन करून, स्वाभीमानाने स्वतःच्या पायावर उभा राहणारी राधीका. त्याचवेळी समाजातील अनेक स्त्रियांना मदतीचा आणि आधाराचा हात देणारी राधिका. मुलगा सुनेला काडीची किंमत देत नसताना, बाहेरख्याली असताना, आईप्रमाणे तिला आधार देणारे तिचे सासू-सासरे हे एक उत्तम सासू- सासर्यांचे उदाहरण आहे, त्यानंतर राधिके प्रमाणेच फसलेली शनाया, राधिकाचा हात धरून नव विश्व निर्माण करते. राधिकाची धडाडी पाहून, स्वाभिमान पाहून घटस्फोटित असतानाही तिला मुलासह स्वीकारणारा सौमित्र, हा एक नवा आदर्श समाजाला घालून देतो.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधील स्वतः च्या नवऱ्याची साथ नसताना सोशिक वृत्तीने, नेटाने संसार चालवणारी, धडाडीने उभा राहणारी, साधी – भोळी आणि सरळ स्वभावाची अरुंधती… , स्वतः च्या मुलाच्या चुका असताना त्याला पाठीशी घालून अरुंधति वर सासुरवास करून, तिच्यावर हक्क गाजवणारी तिची सासू कांचन… तसेच घटस्फोटित असूनही समाजातील इतर स्त्रियांना संकटावर मात करायला शिकवणारी अनघा.. स्वतः नवऱ्याच्या नाकर्तेपणामुळे व सुरक्षित होऊन अनिरुद्ध च्या प्रेमात पडणारी संजना…
‘शंभू राजे’ मालिकेतील स्वतःच्या कुटुंबातील वाद बाजूला ठेवून, शंभूराजांच्या पाठीशी पहाडा प्रमाणे, खंबीरपणे उभी राहणारी, त्यांची बहीण राणूबाई. तसेच ‘अग बाई सासुबाई’ या मालिकेतील सासूची मैत्रीण होऊन, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी शुभ्रा… आपल्याला, समाजाला एक नवा आदर्श घालून देते.आपल्या मुलाच्या चुका समजून सुनेला समजून घेऊन तीच्या पाठीशी उभी राहणारी आणि पुन्हा नव्याने संसार उभा करणारी आसावरी… तिला साथ देणारा अभिजीत… सगळीच उदाहरण आपल्याला एक उत्कृष्ट, अक नवा आदर्श घालून देतात…याच आदर्शांचा आपण विचार करून वाटचाल केली पाहिजे…
ही सगळी उदाहरण पाहता समाजात ही अशा कित्येक राधिका, शनाया, अरुंधती, अनघा, शुभ्रा आहेत. असंच आपल्याला दिसतं. यात प्रत्येक स्त्री च्या सुखाचे कारण एक असलं तरीही दुःखाची कारण मात्र वेगवेगळी असतात. प्रत्येक वळणावर अन्याय सहन करणारी ही फक्त स्त्रीच आहे. ती पेटून उठते जिद्दीने, धडाडीने आणि परिस्थितीला तोंड देऊन नामोहरम करून, पुन्हा आयुष्य जगते, स्वाभिमानाने…. सावित्रीबाई ने एक नवा आदर्श घालून दिला.. अशीच असते कहानी वेगळी प्रत्येकीची… स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे, परिस्थितीवर मात करणे, अन्यायाला तोंड देणे, स्वतःच स्वतःशी केलेली प्रतारणा थांबवणे,
यातूनच निर्माण होते कहाणी वेगळी प्रत्येकीची….
https://susima.home.blog/2021/01/20/कहानी-वेगळी-प्रत्येकीची/
@all rights are reserved.
@Image source Google.
– सुसिमा









